पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
पंडित सुंदरलाल कमिटीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी अशी मागणी एमआयएम व पिडीतांच्या वतीने  औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले आहे. त्या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे इसवी सन 1948 हैदराबाद संस्थान भारतात विलीनीकरण झाल्यानंतर पोलीस कारवाईच्या नावावर बहुसंख्य मुस्लिम समुदायाचे संभाव्य झालेले नुकसान आणि हिंदू- मुस्लिम धर्मियात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर देशाचे पहिले पंतप्रधानांच्या वतीने केंद्र सरकारने माननीय पंडित सुंदरलाल कमिशनची स्थापना केली होती. या कमिशनने हैदराबाद सह मराठवाडा विभागाचा दौरा करून केंद्राला आपला अहवाल सादर केला होता. सदर अहवालातील शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी. पंडित सुंदरलाल कमिशनने केलेल्या शिफारशीची अंमलबजावणी करण्यात यावी. हैदराबाद संस्थान 1948 मध्ये भारतात सामील झाले. त्या काळात केंद्र सरकारने पोलीस ॲक्शन कारवाई केली. या कारवाईच्या काळात समाज कंटकाकडून मुस्लिम समाजाच्या जीविताचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असंख्य महिलावर अत्याचार झाले. अंध, अपंग, निराधार महिलाही त्यामधून सुटल्या नाहीत. मुस्लिम समाजाची दुकाने लुटण्यात आली. हजारो एक्कर जमिनी बळकावण्यात आल्या. सोने, चांदी अशी संपत्ती पळविण्यात आली. असंख्यजन बेवारस झाले अशा कुटुंबाच्या व्यक्तीचा शोध घेण्यात यावा. त्यांच्या वारसांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यातील दोषीच्या नावे असलेली संपत्ती जप्त करून नुकसान झालेल्या पिडीतांना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी एमआयएम व औसा पिडीतांच्या वतीने मागील 10 ते 12  वर्षापासून करीत आहोत परंतु अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. या मागणीचे निवेदन एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजाफर अली इनामदार यांनी औसा तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना आज दिनांक 14 डिसेंबर बुधवार रोजी देण्यात आले. यावेळी निवेदन देताना  एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजाफर इनामदार, नय्युम शेख, अडवोकेट रफिक शेख, हारुणखॉ पठाण, शेख नाजाम, अजहर कुरेशी, शेख अलीम, फारुख काजी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments