औसा शहरातील समस्याची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी आपला अमुल्य वेळ द्यावा: सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
औसा शहरात ब-याच ठिकाणी रस्ते, नाल्या,घाणीचे साम्राज्य व इतर अपूर्ण असलेल्या सोईसुविधा पूर्ण करण्यासाठी आपला अमूल्य वेळ देण्यात यावा जेणेकरून शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा पुरविण्यात येईल.शहरात अनेक ठिकाणी रखडलेली विकास कामे घाणीचे साम्राज्य पसरुन डेंग्यू, मलेरिया यासारखे आजारांपासून नागरिक त्रस्त आहेत.तसेच शहरातील मुख्य रस्ता व गल्लीबोळातील अडचणी निदर्शनास आणून द्यावयाचे आहेत. यापूर्वी आपल्या संदर्भात पत्रकान्वये निवेदन देण्यात आलेली होती.परंतू आपण त्यावर कसलीच कार्यवाही केलेली नाही.सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व नगर पालिकेवर प्रशासक आहे, त्यामुळे शहरातील विविध समस्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपला अमूल्य वेळ देणे गरजेचे आहे. तरी सदरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच शहरातील अप्रोच रोड ते जलालशाही चौक,किल्ला मैदान ते सय्यद सादात दर्गा, तहसिल कार्यालय ते कुरेशी मस्जिद, लातूर वेस ते जामा मस्जिद तिसरा टप्पा,तसेच शहरालगत असलेला जूना रस्ता शहरात एकही रस्ता शहरात येण्यासारखा नाही,याची वारंवार सूचना करुन ही नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.तरी आपला अमूल्य वेळ देऊन एम आय एम ची मागणी पूर्ण करण्यात यावी अन्यथा एम आय एम च्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 Comments