तोडण्यात आलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या औसा येथील कार्यालयात मनसेचे विद्युत पुरवठा जोडला जात नाही तोपर्यंत इथुन न हलण्याचा घेतला निर्णय.आंदोलन
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडणी मोहीम शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा कल्पना न देता विजवितरण कंपनीने हात घेतली असून ऐन रब्बी हंगामात अनेक गावांतील रोहीत्र बंद केले आहेत.त्याचा निषेध म्हणून औसा येथे मनसेच्या वतीने तोडण्यात आलेले कनेक्शन तात्काळ जोडण्यात यावीत या मागणीसाठी दिनांक 2 डिसेंबर 2021 गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या औसा येथील कार्यालयात मनसेचे तालुकाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांच्यासह महेश बनसोडे,जिवन जंगाले, राजेंद्र कांबळे,तानाजी गरड,अमोल थोरात,ईश्वर परीहार, गणेश चिखले,आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वत:ला घेतले कोंडून. जोपर्यंत विद्युत पुरवठा जोडला जाणार नाही तोपर्यंत इथुन न हलण्याचा घेतला निर्णय.
0 Comments